लग्न शक्य नाही म्हणून प्रेमी युगुलाने घेतल्या रेल्वेपुढे उड्या मात्र नियतीच्या मनात ‘ वेगळेच ‘

शेअर करा

‘ आपला विवाह होऊ शकणार नाही आणि आपण एकमेकांशिवाय जगू शकणार नाही ‘, हे लक्षात आल्यानंतर एका प्रेमीयुगुलाने आत्महत्येचा निर्णय घेतला त्यानंतर दोघांनी बिहार येथील पाटणा नजीक फतवा रेल्वे स्टेशनजवळ धावत्या गाडीसमोर उड्या मारल्या. या घटनेत युवतीचा जागीच मृत्यू झाला मात्र तरुणाचा उजवा हात पूर्णपणे कापला गेला. त्याच्या डोक्याला खूप मार लागला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, निशा कुमारी आणि दिपक कुमार हे दोघे एकाच गावातील रहिवासी होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी विवाह करण्याचा निर्णय देखील घेतला होता, मात्र दोघांच्याही घरातून त्याला कडाडून विरोध झाला. जर आपला विवाह होत नसेल तर जगून तरी काय फायदा असा विचार करत त्यांनी मंगळवारी सकाळी धावत्या रेल्वे खाली उड्या मारल्या. त्यानंतर अंगावरून गाडी गेल्याने युवती जागीच ठार झाली तर उजवा हात पूर्णपणे कापला जाऊन देखील दिपक कुमार हा थोडक्यात बचावला. त्यांच्या ओळख पत्रामुळे त्यांची ओळख पटली असून दीपकवर उपचार सुरु आहेत.

एकमेकांशिवाय राहू शकत नाही म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला मात्र तरीदेखील या प्रेमीयुगुलांचे हे स्वप्न अपूर्ण राहिले आणि एकत्र मरण्याची इच्छा देखील अपूर्णच राहिली. ही बातमी कळताच गावकर्यांना एकच धक्का बसला आणि सदर घटनेनंतर दोन्ही कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. पोलिस देखील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


शेअर करा