नगर ब्रेकिंग..अन दुसऱ्याच दिवशी शेतातील २ एकर कांदा गायब

शेअर करा

आर्थिक अडचणीमुळे कधीही कसली चोरी होईल याचा काही भरवसा राहिलेला नाही अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील चिचोंडी शिराळ येथे घडली असून एका शेतकऱ्याच्या शेतातील दोन एकर कांदा रात्रीतून गायब झाला आहे. पाथर्डी तालुक्यात ही घटना घडली असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा आहे .

चिचोंडी शिराळ आणि कोल्हार परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले, याच पद्धतीने येथील बटाईदार शेतकरी शंकर पुंजाजी घोरपडे यांनी देखील कांद्याचे पीक घेतले होते. त्यांना येत्या दोन चार दिवसात कांदा काढणीस सुरुवात देखील करायची होती मात्र त्यापूर्वीच एकाच रात्री चक्क दोन एकर कांदा शेतातून गायब झाला.

कांदे चोरून नेण्यात येणार्‍या चोरट्यांनी सदर चोरी ही अगदी निवांतपणे केल्याचे घटनास्थळी दिसून आले. कांदे आणि कांद्याची पात त्यांनी बाजूला केली आणि कांदे घेऊन फरार झाले तर पात घटनास्थळी आढळून आली.

सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरट्यांनी ही चोरी केली असल्याचा अंदाज आहे. कापसाला देखील सध्या चांगला भाव असून याच परिसरात काही शेतकऱ्यांनी कापसाची देखील चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. शेतातील पिकांची चोरी हा प्रकार धक्कादायक असून पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


शेअर करा