‘ मला तो घरात हवाच ‘, प्रियकराला देखील घरात घेण्यासाठी बायकोच हट्टाला पेटली

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून एक विवाहित महिलेने फेसबुकवर नवीनच झालेल्या मित्रासाठी चक्क १२ वर्षाच्या संसाराला ठेंगा दाखवत त्याच्यासोबत पलायन केले आहे . महिलेच्या पतीने चक्क पत्रकार परिषद घेऊन आपल्या दुःखाला वाचा फोडली आहे . बातमी चंद्रपूर येथील असून आपली पत्नी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली असून ती माझ्या आईवडिलांनाही मारहाण करत असे तसेच ती त्यांना जेवणही देत नसे, असे देखील धक्कादायक आरोप पत्नीवर केले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथील रहिवासी वामन मेश्राम यांनी पारंपरिक पद्धतीने विवाह केला होता. त्यांची पत्नी निकिती ह्या मूळच्या नागपूर येथील आहेत. काही वर्षे त्याचा संसार चांगला चालला होता मात्र पतीच्या म्हणण्याप्रमाणे, काही वर्षांनी निकिती मला मानसिक त्रास देऊ लागली. तसेच ती मुलांनाही त्रास देऊ लागली. इतकेच नाही तर माझ्या आई-वडिलांना देखील त्रास देऊ लागली. त्यांना मारहाणही करू लागली.

निकीती माझ्या आई-वडिलांना हुंडाबळी प्रकरणात फसवण्याची धमकीही देऊ लागली. आपण आत्महत्या करू आणि संपूर्ण मेश्राम कुटुंबाला त्यात फसवू . गुपचूप रहाते घर माझ्या नावे कर अन माझ्या प्रियकराला घरात येण्यास मज्जाव होता कामा नये, अशा मागण्या ती करू लागली. अशा प्रकारच्या सर्व गोष्टींमुळे आपल्याला मोठा मानसिक त्रास झाला आणि त्यातून आमच्यात वादावादी देखील झाली.

अखेर आपल्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि मला तसे सांगितले त्यावेळी मी हे प्रकरण घेऊन गावातील तंटामुक्ती समितीकडे घेऊन गेलो व सोबतच पोलिसातही याबाबत तक्रार दिली. मात्र अशा प्रकरणांमध्ये पुरुषांच्या बाजूने कायदा अस्तित्वात नसल्याचे उत्तर आपल्याला पोलिसांनी दिल्याचे वामन मेश्राम यांनी सांगितले. एखाद्या पुरुषाची एखाद्या महिलेकडून फसगत झाली, तर काय करायचे, असा सवाल वामन मेश्राम यांनी विचारला आहे.


शेअर करा