स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन उग्र होण्याच्या आधीच सरकारकडून त्यांना चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आणि अनेक महत्वाचे निर्णय देखील यावेळी घेण्यात आले आहे . रविकांत तुपकर यांनी सोयाबीन व कापूस उत्पादकांची बाजू या बैठकीत ताकदीने मांडली.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह कृषी, वित्त व नियोजन, सहकार-पणन, ऊर्जा, महसूल यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. विशेष म्हणजे राजू शेट्टी या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
बैठकीत कोणते निर्णय झाले?
- राज्य सरकार सोयाबीन, तेलबिया-खाद्यतेलावर स्टॉक लिमिट लावणार नाही
- अतिवृष्टीचे राहिलेले अनुदान आठवडाभरात जमा करणार
- शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाला बँकांनी होल्ड लावू न देण्याच्या सरकारकडून सूचना
- शेतकऱ्यांचा विमा नाकारणाऱ्या व खोटे रेकॉर्ड तयार करणाऱ्या कंपन्यांवर कृषी विभाग गुन्हे दाखल करणार
- शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक
- नादुरुस्त रोहित्रे तात्काळ देणार
- कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांचे पैसे फेब्रुवारी अखेरपर्यंत जमा करणार
- दोन्ही कर्जमाफीतून सुटलेल्या शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंत कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान लवकर देण्याचा प्रयत्न
- नदी काठच्या खरडून गेलेल्या जमिनी तयार करण्यासाठी दिलेली मदत अपुरी असल्याने स्वयंसेवी संस्थाकडून सीएसआर फंड उभा करणार