तीस वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलाला लग्नासाठी भुलवले , सगळी तयारी झाली अन अचानक..

शेअर करा

प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं, असे म्हटले जात ते काही उगाच नाही. अमरावती जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आलेली असून चक्क एक अल्पवयीन मुलगा ३० वर्षीय परित्यक्ता महिलेच्या प्रेमात पडला आणि वारंवार त्याच्यात भेटीगाठी सुरु झाल्या. मुलाच्या कुटुंबीयांनी सांगून देखील त्याच्या आणि त्या महिलेच्या वर्तनात बदल होईना म्हणून अखेर जातपंचायतींने त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता आणि विवाह लावून देण्याची सारी तयारी झालीच होती मात्र कहाणीत अचानक ट्विस्ट आला आणि विवाह थांबवण्यात आला.

उपलब्ध माहितीनुसार , तळेगाव दशासर पोलीस स्थानकांतर्गत ही घटना उघडकीस आली आहे. गावात नव्यानेच राहायला आलेल्या त्या ३० वर्षीय महिलेने या अल्पवयीन मुलाला आपण विवाहित असून तीन लहान मुलांची आई असल्याची माहितीसुद्धा दिली होती मात्र आकर्षणाच्या ओघात वाहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आणि वयस्कर महिलेच्या प्रेमाच्या गाठीभेटी सुरु झाल्या .

अवघ्या काही दिवसात त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आणि पूर्ण गावात याची चर्चा सुरु झाली मात्र या दोघांनी देखील विवाह बंधनात अडकण्याचा ठामपणे निर्णय घेतला. २७ डिसेंबर रोजी विवाहाचा मुहूर्त ठरला होता. लग्नाची तयारी सुरू झाली मात्र दुसरीकडे प्रकरणाची चांगलीच चर्चा झाल्याने यांची माहिती बाल संरक्षण कक्ष व पोलिसांना मिळाल्याने हा विवाह थांबविण्यासाठी प्रयत्न पोलिसांकडून सुरु झाले.

२७ डिसेंबर रोजी त्या गावात ग्रामसभा सुरू होती आणि त्यात त्यांचे लग्न लावून देण्यासाठी निर्णय घेण्यात आला मात्र अचानक बाल संरक्षण कक्ष, जातपंचायत आणि पोलीस विभागाच्या सहकार्यातून हा विवाह थांबविण्यात आला. संबंधित ठिकाणी पोहोचून तेथील कुटुंबियांना ही बाब कायद्याने गुन्हा आहे, हे सांगितले तसेच गावातील ग्रामसभेत अशाप्रकारच्या घटना गावात होता कामा नयेत, अशी तंबी देण्यात आली आणि हा विवाह थांबवण्यात आला.


शेअर करा