मोठी बातमी : तब्बल तेरा आमदार भाजपला रामराम ठोकणार ?

शेअर करा

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून १० मार्चला निकाल येणार असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे .पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा उतरणार असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत, ‘ आगामी काळात भाजपला आणखी मोठे झटके बसणार असून 13 आमदार भाजपला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता हे 13 आमदार कोण ? ‘ असा सवाल उपस्थित होत आहे.

उत्तरप्रदेशात भाजपची सत्ता असून येथे निवडणुकीपूर्वी भाजपला एकामागे एक असे झटके बसताना दिसत आहेत तर दुसरीकडे सरकारी सेवेत असलेले अधिकारी नोकरी सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. उत्तरप्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आजच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा येत समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे.

अखिलेश यादव यांची भेट घेऊन स्वामी प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. स्वत: अखिलेश यादव यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. अखिलेश यादव यांनी एक फोटो ट्विट करत म्हटलं, “सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत समाजवादी पक्षात आलेले इतर नेते, कार्यकर्ते या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा.”

स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यावर शरद पवारांनी म्हटलं आहे की, ‘ स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा आणि पक्षाचाही राजीनामा दिला आहे. राजीनामा देत त्यांनी समाजवादी पक्षाला समर्थन देण्याचं म्हटलं. त्यांच्यासोबत 13 आमदार आणि आणखी काही सहयोगी त्यांना समर्थन देणार असल्याचंही म्हटलं आहे. तुम्ही पाहाल येत्या काळात दररोज एक-एक नवा चेहरा भाजपतून बाहेर पडेल आणि इकडे येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की , ज्या प्रकारे आश्वासन नागरिकांना देण्यात आलं आणि ज्या प्रकारचा विश्वास देण्यात आला यात काहीही तथ्य नाहीये हे उत्तरप्रदेशातील नागरिकांच्या आता लक्षात आलं आहे. उत्तरप्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र निवडणूक लढणार असून एकत्र बैठकीत जागा वाटप धोरण ठरणार असल्याचं शरद पवार म्हणाले.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

  • पहिल्या टप्पा – 10 फेब्रुवारीला मतदान
  • दुसरा टप्पा -14 फेब्रुवारी
  • तिसरा टप्पा -20 फेब्रुवारी
  • चौथा टप्पा -23 फेब्रुवारी
  • पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी
  • सहावा टप्पा – 3 मार्च
  • सातवा टप्पा -7 मार्च
  • अंतिम निकाल : 10 मार्च

शेअर करा