नगरमध्ये खळबळ..कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाने घेतली विहिरीत उडी

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून कर्जबाजारीपणाला कंटाळून एका तरुणाने विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. पिंपळगाव माळवी येथे ही घटना घडलेली असून प्रसाद रघुनाथ साबळे ( वय 32 राहणार पिंपळगाव माळवी ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

प्रसाद साबळे यांनी डिजिटल मीडिया क्षेत्रात चांगले नाव कमावले होते मात्र गेल्या तीन दिवसांपासून ते घरातून गायब झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ते हरवल्याची नोंद केलेली होती. त्यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांनी त्यांचा नातेवाईकाकडे शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत.

एकीकडे तपास सुरू असताना दुसरीकडे सोळा तारखेला नगर औरंगाबाद रोड वरील इंद्रायणी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीत त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह विहिरीतून काढला आणि पोस्टमार्टमसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रसाद हे कर्जबाजारीपणाला कंटाळून होते त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


शेअर करा