नवविवाहितेला पती म्हणाला ‘ मी पुन्हा येईन ‘ मात्र तोपर्यंत , डॉक्टर म्हणतात की..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून सातत्याने चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीच्या वागणुकीला वैतागून एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना नागपूरनजीक बुटीबोरी येथे उघडकीला आली आहे. संशयाचे भूत मनात शिरले कि संसाराची राखरांगोळी करून टाकते असे या घटनेने अधोरेखीत झालेले आहे. पती पुन्हा मारहाण करेल या भीतीने पतीने उंदीर मारण्याचे विषारी औषध खाऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी 14 तारखेला ही घटना उघडकीला आली असून आरोपी पती फरार झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राणी रवी उंबरकर ( वय 25 ) असे मयत महिलेचे नाव असून तिचा पती रवी पुंडलिक उंबरकर ( वय 32 राहणार बुटीबोरी नागपूर ग्रामीण ) असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून तो बुटीबोरी येथे एका सलूनमध्ये काम करत होता तर राणी हिचे माहेर देखील यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आलेली आहे .

राणी आणि रवी तिच्या आईकडे गेले होते. दोघेही सोमवारी त्यांच्या घरी परत येणार होते मात्र रवी आणि तिचे आई-वडील कामानिमित्त निघून गेल्याने ती घरी एकटीच होती. अशातच दुपारी दीडच्या सुमारास रवि घरी आला आणि राणी घरी एकटीच असल्याचे पाहून तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली त्यातून त्याने तिला मारहाण केली आणि ‘ मी पुन्हा येईन ‘ असे दरडावून तो निघून गेला. दोघांचे लग्न हे अवघ्या १२ दिवसांपूर्वी झाले होते.

रवी पुन्हा आला तर आपल्याला मारहाण करील अशी भीती पत्नीच्या मनात निर्माण झाली आणि त्यातून तिने उंदीर मारण्याचे विषारी औषध खाल्ले आणि त्यातच तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाला. तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आणि त्यानंतर आरोपी पती याच्यावर भा द वि 306 324 अन्वयेगुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती समजताच तो फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


शेअर करा