उत्तर प्रदेशासह चार राज्यात घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून भाजपच्या पदरात जनतेने भरभरून मते टाकली आहेत मात्र सेना राष्ट्रवादीची मजल ही फक्त नोटापर्यंतच आहे, अशी टीका भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केली आहे.
दहा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, ‘ भाजपला चार राज्यात मिळालेले यश हे जनतेने भाजपच्या नेत्यांवर दाखवलेला विश्वास दर्शवत असून शिवसेना-राष्ट्रवादीला नोटा इतकेही मते मिळाली नाहीत. जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. शब्द फिरवणे ही राष्ट्रवादीची प्रवृत्ती होती मात्र आता शिवसेना देखील त्यांच्यासोबत असल्याने राष्ट्रवादीचा हा गुण शिवसेनेलाही लागला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते रोज टीव्हीवर येऊन आता ते लोकांच्या करमणुकीचे माध्यम झाले आहेत त्यामुळे टीव्ही कलाकारांचे मानधन कमी झाले आहे. या अगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 2022 च्या निवडणुकीवर 2024 ची निवडणूक अवलंबून आहे असे म्हटले होते मात्र आता ते या निवडणुकीचा 2024 च्या निवडणुकीवर परिणाम होणार नाही असे सांगत आहेत, अशी देखील टीका केली आहे.