नगरमध्ये अपहरणकांड ? अखेर सार्थकच्या वडिलांची पोलिसात फिर्याद

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना नगर शहरानजीक केडगाव येथे उघडकीला आली असून शुक्रवारी शाळेत चाललोय म्हणून गेलेला मुलगा अद्यापपर्यंत घरीच आलेला नाही. सोमवारी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून कोतवाली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सार्थक दिलीप पाचारणे ( वय 15 मोहिनीनगर केडगाव अहमदनगर ) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव असून सदर प्रकरणी त्याच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, पाचारणे कुटुंबीय केडगाव उपनगरातील मोहीनीनगर येथे राहत असून त्यांचा मुलगा सार्थक शुक्रवारी बारा वाजता सकाळी नऊच्या सुमारास शाळेला निघून गेला. त्यानंतर आई आणि वडील कामावर गेले. ते रात्री घरी आले तेव्हा सार्थक घरी आलेला नव्हता म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीकडे विचारणा केली असता सार्थक शाळेला गेला होता अशी माहिती समजली.

आई-वडील आणि परिसरातील नागरिकांनी देखील सगळीकडे तपास केला मात्र तरीदेखील तो मिळून आला नाही त्यानंतर अखेर हतबल झालेल्या आईवडिलांनी कोतवाली पोलिस स्टेशन गाठून मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून तक्रारीवरुन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल इघे करत आहेत.


शेअर करा