अखेर ‘ ती ‘ आत्महत्या नव्हे तर खूनच, नगरमधून होळीला गेले होते दाम्पत्य

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून बुलढाणा जिल्ह्यात साखरखेरडा परिसरात अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा पत्नी आणि तिच्या प्रियकराने गळा आवळून खून केला आहे. 15 मार्च रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात याप्रकरणी मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, दत्तात्रय रूपलाल कव्हळे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी एजाज खान शहजाद खान आणि मृताची पत्नी मीरा यांना अटक केली आहे. दत्तात्रय यांना आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची खबर लागली होती त्यामुळे रंगेहाथ पकडल्याने या पत्नीने प्रियकराला मदतीला घेत पतीचा खून केला आहे.

दत्तात्रय पत्नी मीरा हिला घेऊन अहमदनगर येथे कामासाठी गेले होते . होळी सणानिमित्त ते दोघे दोन दिवसांपूर्वीच गावाकडे आले होते. त्यांना तीन अपत्ये असून ते शिक्षण घेत आहेत. मीरा घरी आल्याची खबर याला लागली होती त्यातूनच तो ती एकटी घरी असताना तिच्या घरात घुसला मात्र अचानक दत्तात्रय आल्यामुळे त्यांनी या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले त्यानंतर या दोघांनी दत्तात्रयांचा काटा काढण्यासाठी हातपाय बांधून दोरीने गळा आवळून खून केला.

दत्तात्रय यांचा खून केल्यानंतर आता कसे ? याचा विचार करत मिरा हिने आरडाओरडा करत दत्तात्रय यांनी आत्महत्या केल्याची आवई उठवली. पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही मिनिटातच ही आत्महत्या नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत पत्नी मीरा आणि तिचा प्रियकर यांना बेड्या ठोकल्या आहेत.


शेअर करा