‘ तिला सांगून सांगून थकलो ‘ म्हणून अखेर..,आरोपीकडून धक्कादायक खुलासे

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीला येत असताना अशीच एक घटना जालना जिल्ह्यात उघडकीला आली असून पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून एका पतीने प्रियकराचा चप्पल बूट शिवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्याराने डोक्यात वार करून खून केला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव शिवारात ही घटना घडली असून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

परतूर तालुक्यातील बाजीराव विनायक माने ( वय 45 ) याचा चप्पल बूट शिवण्याचा व्यवसाय आहे. बाजीराव माने याची पत्नी हिचे नात्यातील असलेल्या रोहिदास लक्ष्मण खरात ( वय 40 ) याच्यासोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण लागल्यानंतर बाजीराव याने रोहिदास आणि त्याची पत्नी या दोघांनाही समजून सांगितले होते मात्र त्यांच्या वर्तनात कुठलाही बदल दिसून येत नसल्याने बाजीराव माने याने रोहिदास याचा कायमचा काटा काढण्याचे ठरले ठरवले.

15 मार्च रोजी रोहिदास खरात हा गोदावरी येथील बाजारात चप्पल बूट व्यवसायासाठी गेला होता याची माहिती मिळाल्यानंतर कोकाटे हादगाव शिवारातील मारुती मंदिराजवळ त्याला गाठत बाजीराव माने यांनी चप्पल बूट शिवण्याच्या हत्याराने त्याच्या डोक्यात वार करून त्याचा खून केला. सदर प्रकरणी मयत व्यक्तीचा भाऊ नामदेव लक्ष्मण खरात यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपास सुरू असताना आरोपी माने यांच्या पत्नीचे रोहिदास यांच्या सोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली आणि पोलिसांनी संशयित असलेला बाजीराव माने याला ताब्यात घेतले असता त्याने रोहिदास खरात याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध होते म्हणून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


शेअर करा