काही घटनांची गुंतागुंत इतकी विचित्र असते ही पोलीस देखील चक्रावून जातात अशाच स्वरुपाची एक घटना नागपूर येथे उघडकीला आली असून एका मित्र-मैत्रिणीने हॉटेलमधून पनीरची भाजी विकत आणली आणि ती खाल्ल्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले मात्र रात्री उशिरा त्यांना उलट्या सुरू झाल्या म्हणून त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले असता त्यातील तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणीही गंभीर अवस्थेत रुग्णालयात आहे. नागपूर येथील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीला आली असून सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, रितिक खोबरागडे ( वय 22 ) असे मयत व्यक्तीचे तरुणाचे नाव असून तो अजनी येथे राहतो तर त्याची प्रेयसी हीदेखील त्याच परिसरात राहते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे सोबत फिरले आणि एका हॉटेलमधून त्यांनी पनीरची भाजी विकत घेत खाल्ली. ती खाल्ल्यानंतर दोघांनीही एकमेकांचा बाय करत निरोप घेतला मात्र घरी गेल्यानंतर त्याला उलट्या होऊ लागल्या.
सातत्याने तोंडातून फेस येत असल्याने घरच्यांनी रितिकला रुग्णालयात दाखल केले तर दुसरीकडे त्याच्या मैत्रिणीसोबत देखील तसाच प्रकार घडत होता. त्यानंतर तिला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची देखील प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
ठाणेदार सारीन दुर्गे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिच्या घरी धाव घेत तसेच त्या तरुणीच्या नातेवाईकांकडे देखील चौकशी सुरू केली त्यावेळी त्यांना तिला फुड पोईजन झाले, अशी माहिती सांगण्यात आली मात्र डॉक्टरांच्या अहवालातून अद्यापपर्यंत ते स्पष्ट झालेले दिसून येत नाही. त्यांनी जेथून भाजी विकत घेतली तिथे इतर लोकांनी देखील जेवण केले मात्र या दोघांनाच त्याचा त्रास कसा झाला ? याचाही पोलीस तपास करत आहेत.