प्रेमविवाह करूनही पती ‘ त्यांच्या ‘ सोबत टाळ्या पिटत फिरायचा, अखेर पत्नीने..

शेअर करा

महाराष्ट्रात औरंगाबाद येथे एक धक्कादायक घटना घडलेली असून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय लग्न केलेल्या 21 वर्षे विवाहितेने शिवाजीनगर येथील गेट नंबर 54 येथे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीला आली असून सदर प्रकरणी जवाहरनगर पोलिस तपास करत असून जे कारण पुढे आले ते ऐकून पोलिसही हादरून गेले आहेत.

जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मिता गणेश उगले ( राहणार काबरा नगर गारखेडा ) असे मयत विवाहितेचे नाव असून तिने सहा महिन्यांपूर्वी गणेश उगले( वय 23 ) याच्यासोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. गणेश हा पत्नी आई-वडील आणि त्याच्या भावासोबत काबरा नगर येथे राहत होता . गणेश आणि स्मिता यांनी १ नोव्हेंबरला आंतरजातीय प्रेमविवाह केला खरा मात्र आपला नवरा हा शिवाजीनगर येथील तृतीयपंथियांसोबत राहतो हे स्मिताला मान्य नव्हते. यावरून त्यांच्यात वाद होत होते.

स्मिताने अनेकदा फोन करून आणि प्रत्यक्ष भेटूनही आईला सांगितली तेव्हा या नवविवाहित जोडप्याची स्मिताच्या आईने समजूत काढली होती मात्र त्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही आणि अखेर स्मिता रविवारी रात्री घरातून निघून गेली. कुटुंबीय तिचा शोध घेत होते मात्र ती सापडली नाही म्हणून त्यांनी सकाळी जवाहरनगर पोलिसात तक्रार दिली आणि अशातच सकाळी जवाहरनगर पोलिसांना रेल्वे समोर एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली त्यानुसार उपनिरीक्षक वसंत शेळके यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्मिता यांचे कुटुंबीय तिथे गेले आणि मयत विवाहिता स्मिता आहे असल्याची त्यांची खात्री पटली.

गणेशने तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे तिच्या आईने तक्रारीत नमूद केले असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वसंत शेळके तपास करीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वेच्या धडकेत सर्वत्र पसरलेले मांसाचे तुकडे गोळा करून घाटी रुग्णालयात नेण्यात आले आणि शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


शेअर करा