प्रियकरासोबत पळाल्यावर बदनामी नको म्हणून विवाहितेचा ‘ मास्टरप्लॅन ‘ फसला , नगरमध्ये बेड्या

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून जर आपण प्रियकरासोबत पळून गेलो तर आपली बदनामी होईल म्हणून वेगळे काहीतरी करायचे असा प्रयोग एका विवाहितेने केला मात्र तिचा हा प्लॅन फसला. एका विवाहितेने प्रियकराकडून स्वतःचेच अपहरण करून घेतले आणि तिच्या पतीने पोलिसात आपल्या बायकोचे अपहरण झाल्याची तक्रार दिली मात्र पोलिसांनी अवघ्या पाच तासात त्यांना बेड्या ठोकल्या त्यावेळी हा सर्व पर्दाफाश झाला. पुणे जिल्ह्यात नारायणगाव येथील वैद्य वस्ती येथे हा प्रकार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीला आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका विवाहितेला तिच्या प्रियकरासोबत पळून जायचे होते मात्र जर आपण पळून गेलो तर माहेरी आणि सासरी दोन्हीकडे देखील बदनामी होईल या भीतीने तिने स्वतःचे डोके वापरत आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी एक प्लॅन रचला. तिने तिच्या प्रियकराला कारमधून स्वतः बोलून घेतले आणि स्वतःचे अपहरण करून घेतले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तो कारमधून खाली उतरला आणि त्याने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तो फरार झाला .

मास्टर माईंड महिलेच्या पतीने या प्रकाराची पोलिसात फिर्याद दिली मात्र पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत गाडी क्रमांक शोधला त्यावेळी ही गाडी बेल्हा रोडने नगरकडे गेल्याचे दिसून आले. तपास पथक नगरकडे रवाना झाले. नगरमध्ये कारच्या मालकांनी त्यांची कार महेश लोखंडे व राहुल कनगरे ( राहणार राहुरी ) हे येऊन गेले आहेत अशी माहिती दिली. संध्याकाळी पाच वाजता हे कार परत देण्यासाठी येणार आहेत असेही त्यांनी सांगितले आणि पोलीस जागेवरून हललेच नाहीत.

संध्याकाळी पाच वाजता ते आल्यावर पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुर्वे यांच्या पथकाने त्यांना पकडले. सदर प्रकरणी नक्की काय काय घडले ? याची माहिती सध्या पोलिस त्यांच्याकडून हस्तगत करत आहेत .


शेअर करा