औरंगाबादमधील एकतर्फी प्रेमातून हत्येचा आरोपी शरणसिंग ‘ इथे ‘ सापडला

शेअर करा

औरंगाबाद इथे 21 मे रोजी शहरातील देवगिरी महाविद्यालय परिसरात एकतर्फी प्रेमातून ओढत नेऊन तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. शरणसिंग सेठी ( वय २० ) नावाच्या एका आरोपीने एका १८ वर्षीय तरुणीला ओढत नेत चाकू भोसकून तिची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे शेकडोच्या संख्येत लोक जमले मात्र ते फक्त पाहत राहिले होते. तरुणीचा खून करून आरोपी फरार झाला होता मात्र त्याला अखेर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस आणि औरंगाबाद पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील लासलगावमधून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका मालट्रकमधून तो पळून जाण्याच्या बेतात होता.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद येथे उघडकीला आली होती. एका विकृत नराधमाने एका मुलीला ऑफिसच्या समोरून नेले आणि त्यानंतर तिची हत्या केली. बराच वेळ यांच्यात झटापट सुरू होती मात्र त्यांच्या या भांडणात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी चक्क बघ्याची भूमिका घेतल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात होता .

मयत मुलीचे नाव कशिश उर्फ सुखप्रीत कौर ( वय १८ ) असे तरुणीचे नाव असून तरुणाचे नाव शरणसिंग सेठी ( वय २० ) असे आहे. शरणसिंग नावाच्या नराधमाने तिच्या पोटावर डाव्या बाजूने चार तर उजव्या बाजूने नऊ वार केले. जखम खोलवर असल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि काही वेळातच तिने प्राण सोडले त्यानंतर तिचा मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला.

शरणसिंग गॅरेजमधील काम करणारा मेकॅनिक असून काही दिवसांपूर्वी त्याने हे काम सोडले होते. त्याचे वडील रिक्षाचालक असून त्याची मैत्रीण कशिश ही सुखवस्तू कुटुंबातील आहे. घटना घडल्यानंतर शरणसिंग फरार झालेला असून त्याच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती .

त्याचा मोबाईल देखील बंद येत असून त्याने कशिश मृत्युमुखी पडल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या तिच्या मैत्रिणीला ‘ मै भी उसके पास जा रहा हू ‘ असे म्हटल्याने तो आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकतो असेही अशीही शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र त्याच्या आधीच त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.


शेअर करा