औरंगाबाद पुन्हा हादरलं मात्र ‘ तो ‘ शिर्डीत धरला , धक्कादायक कारण आले समोर

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद शहरात उघडकीस आली असून पुंडलीकनगरमध्ये एका वृद्ध पती-पत्नीची हत्या करण्यात आली आहे. कुजलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडालेली होती. प्राथमिक अंदाजानुसार हा खून मुलाने केल्याचा संशय होता मात्र त्याला आता शिर्डी इथे पकडण्यात आले आहे. दोनच दिवसापूर्वी एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचा खून केल्याची घटना ताजी असतानाच हा नवीन प्रकार समोर आलेला होता.

उपलब्ध माहितीनुसार, शामसुंदर हिरालाल कलंत्री ( वय ५५ ) आणि किरण शामसुंदर कलंत्री ( वय ४५ ) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता आणि हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवलेला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला व आरोपीला बेड्या ठोकल्या.

धारदार शस्त्राने निर्घृण खून करून आई वडिलांचा मृतदेह पलंगाच्या खाली लपवून आरोपी घराला बाहेरून कुलूप लावून गायब झाला होता. पोलिसांच्या तपासात मुलानेच केवळ ७०० रुपयांसाठी आई-वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले असून आरोपी मुलगा आकाश कलंत्री यास शिर्डी येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शामसुंदर हिरालाल कलंत्री यांचा भांडी विक्रीचा व्यवसाय असून मुलगा आकाश याने हिशोबात घोळ केल्याचे वडिलांच्या लक्षात आले होते . त्यावरून त्यांच्यात भांडणे झाली आणि आकाशाने वडिलांचा खून केला आणि त्यावेळी घरी असलेल्या सावत्र आई किरण (४५ ) यांचाही खून केला. खून केल्यानंतर त्याने दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाच्या खाली लपवले आणि शिर्डीला फरार झाला. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला जेरबंद केले आहे.


शेअर करा