‘ मला तू जशी हवी होती तशी नाहीस ‘, गोव्यातील एकाच रात्रीनंतर तरुणाचा लग्नाला नकार

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातून समोर आलेली असून लग्न जमल्यानंतर काही काळ सर्व काही व्यवस्थित होते मात्र अचानकपणे नवरा-नवरीच्या मनात लग्नाआधी प्री वेडिंग शूटिंग करण्याचे मनात आले आणि त्यांनी गोवा गाठले. बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात हा प्रकार समोर आलेला असून गोव्याला गेल्यानंतर एक रात्र दोघेही एकाच खोलीत होते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यानंतर नवरदेवाने ‘ मला तू जशी हवी होती तशी नाहीस ‘ असे म्हणत लग्न मोडले आहे. सदर प्रकारानंतर नवरी घाबरून गेली आणि तिने आपल्या माहेरच्यांना या प्रकाराची कल्पना दिली. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मात्र सदर प्रकारावर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका 20 वर्षीय तरुणीचे एका 25 वर्षीय तरुणाशी लग्न ठरलेले होते. जानेवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा देखील झाला. दोघेही उच्चशिक्षित असून कोरोना काळापासून ते वर्क फ्रॉम होम करत आहेत. साखरपुडा झाल्यानंतर त्यांच्यात गुलुगुलु गप्पा देखील सुरू झाल्या आणि नवरदेवाने तिला प्रेमाने एक मोबाईल देखील घेऊन दिला.

बरेच दिवस त्यांची रोमँटिक स्टोरी चांगली चालली आणि एप्रिल महिन्यात तरुण, तरुणीची एक जवळची नात्यातली मैत्रीण आणि दोन फोटोग्राफर सोबत घेत त्यांनी प्री वेडिंग शूटिंग करू असे सांगत गोवा गाठले. गोव्यात दिवसभर वेगवेगळ्या अँगलमध्ये पोज देऊन झाल्यानंतर रात्री त्या दोघांनी एकाच खोलीत मुक्काम केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होणारा पती झोपेतून उठला आणि त्यानंतर त्याने वाद घालायला सुरु केले. मला जशी पत्नी हवी होती तशी तू नाहीस, असे म्हणत लग्नाला नकार दिला.

आपल्या सोबत झालेल्या या धक्कादायक प्रकारानंतर होणारे नवरी घाबरून गेली आणि तिने झालेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला आणि त्या दोघींनी कसेबसे करत आपले घर गाठले. घरी गेल्यानंतर त्यांनी आई-वडिलांना या प्रकाराची कल्पना दिली मात्र त्यांनी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला आणि समजुतीने यावर काहीतरी तोडगा काढू असे सांगितले. सदर प्रकरणी प्रेमाने तोडगा काढण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे मात्र नवरदेवाची अद्याप मनधरणी झालेली नाही.


शेअर करा