नगरमध्ये खळबळ..किरकोळ कारणावरून सात जणांची एकास मारहाण

शेअर करा

नगर शहरात एक खळबळजनक घटना चौपाटी कारंजा येथे उघडकीला आलेले असून पिण्याचे पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यानंतर सदर प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, खलिल यासीन सय्यद ( वय 45 ) यांच्यावर हल्ला झालेला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत . बुधवारी एक तारखेला हा प्रकार घडलेला असून सकाळी साडेनऊच्या सुमारास पाणी भरण्याच्या वादातून दोन कुटुंबात भांडणे सुरू झाली आणि त्यातून हा प्रकार घडला.

खलील सय्यद यांच्या शेजारी असलेले वसीम शेख यांनी नळाला पाणी आल्यानंतर मोटार जोडली होती आणि ती साडेनऊच्या सुमारास काढून घेतली त्यावेळी खलील हे वसीम याची पत्नी रेशम हिला ‘ आम्हाला पिण्याचे पाणी भरायचे आहे तुम्ही मोटार का बंद केली ? ‘ असा प्रश्न विचारला आणि त्यातून वादावादी सुरू झाली त्यानंतर खलील यांना सात जणांनी लाकडी दांडके, फरशी, कोयता यांनी मारहाण केली.

सदर प्रकरणी रेश्मा खलील सय्यद ( वय 35 ) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानंतर वशिम शेख, युसुफ शेख, रेशम शेख, यास्मिन शेख आशा फारुक शेख आणि मुकुंद नगर येथील रहिवासी असलेला एक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा