महाराष्ट्र हादरला..लग्नानंतर पाचच दिवसात माहेरी आल्यावर प्रियकराला फोन अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना उघडकीस आली असून सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात एका प्रेमी युगुलाने आपापल्या घरी आत्महत्या केली आहे. जत तालुक्यातल्या एकुंडी येथील ही घटना असून तरुणीचे लग्न होऊन अवघे पाच दिवस झाले होते . नवविवाहिता माहेरी आली आणि तिने प्रियकरासोबतच त्याच वेळी मात्र आपल्या घरी आत्महत्या केली. विष प्राशन करून त्यांनी हा प्रकार केलेला असून लक्ष्मण संभाजी शिंदे ( वय २२ ) व नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी ( वय २१ ) अशी त्यांची नावे आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , दोघेही जत तालुक्यातील एकुंडी येथील रहिवाशी होते आणि त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. १ जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील एका तरुणाशी झाला आणि ती सासरी निघून गेली मात्र पुन्हा माहेरी आल्यावर तिने प्रियकरासोबत हे टोकाचे पाऊल उचलले. आपापल्या घरामध्ये सकाळच्या सुमारास दोघांनीही विषप्राशन करुन आत्महत्या केली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

अश्विनी लग्नानंतर रविवारी एकुंडी येथे आली होती त्यानंतर सोमवारी सकाळी दोघांनीही आपापल्या घरी विषारी औषध प्राशन केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एकमेकांना फोन करून हा निर्णय घेतला असल्याची शक्यता असून दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दोघांच्याही घरच्या लोकांना लक्षात येताच त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून तपास पोलीस करीत आहेत.


शेअर करा