..अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढणार, नगरसेवक आसिफ सुलतान यांचा इशारा

शेअर करा

नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात पाच ते सहा दिवसातून एकदाच पाणी येत असून नागरिकांचे पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. मुकुंदनगर येथील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नगरसेवक आसिफ सुलतान यांनी दिलेला आहे. मुकुंदनगरच्या पाणीप्रश्नी त्यांनी परिसरातील अनेक नागरिकांच्यासोबत आयुक्त यांची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मुकुंदनगर मधील प्रभाग क्रमांक तीन येथील दर्गा दायरा, अलमास पार्क, राज नगर, नशेमन कॉलनी, जीशान कॉलनी, शाहशरीफ पार्क बजाज कॉलनी, दरबार कॉलनी., हुसेन कॉलनी, नम्रता पार्क या परिसरात नियमितपणे पाणीपुरवठा होत नाही. महापालिका अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्याची दखल घेतली जात नाही आता जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मनपा आयुक्तांना या प्रकरणी निवेदन देण्यात आलेले असून यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, नगरसेवक असिफ सुलतान , अनिस चुडीवाला, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, इम्रान बागवान, समीना शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणावर परिसरातील नागरिक उपस्थित होते.


शेअर करा