महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ? शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की..

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या जोरदार राजकीय घमासान सुरू असून शिवसेनेत झालेल्या अंतर्गत बंडाळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शंका फेटाळून लावत आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून महाविकास आघाडी राज्यात कायम राहील, असे स्पष्ट केले आहे तसेच संख्याबळ असले तर शिंदे गटाने मुंबईत यावे असे देखील आव्हान शरद पवार यांनी केलेले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, ‘ बंडखोर आमदार राज्यात परत येतील आणि राज्यात आल्यानंतर त्यातील बहुतांश आमदारांची भूमिका बदलेल. शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांची शक्ती संघटन आणि कौशल्य यांच्या बळावर उभा असल्याने बंडखोरांनी केलेल्या बंडाचा शिवसेनेच्या संघटनेवर काहीही परिणाम होणार नाही उलट शिवसेना आणखी मजबूत होईल ‘.

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ते पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजप सरकारवर देखील शरद पवार यांनी निशाणा साधताना, ‘ अडीच वर्ष महाविकास आघाडीत राहिल्यानंतर अचानकपणे बंड कसे काय केले गेले ? त्यानंतर बंडखोरांनी गुजरात आणि आसाम ही दोन भाजपची सत्ता असलेली राज्य का निवडली ? आणि बंडखोरांकडे जर आवश्यक संख्याबळ असेल तर ते गुवाहाटीत का थांबलेले आहेत असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिंदे यांच्या गटाला सत्ता परिवर्तन हवे असले तरी या लढाईत उद्धव ठाकरे यांचा विजय होईल अशीही खात्री शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.


शेअर करा