बिहार विधानसभेत एक वेगळीच घटना समोर आलेली असून विधानसभेत चर्चा सुरू असताना झालेल्या गदारोळात वैकुंठपूर येथील राजदचे आमदार प्रेम शंकर प्रसाद यांच्या अंगठीतील लाखो रुपयांचा हिरा गायब झालेला आहे. अग्नीपथ योजनेला विरोध सुरू असताना प्रेमशंकर हे विरोधकांसोबत बाक वाजवत असताना हा हिरा गायब झाला.
प्रेमशंकर यांनी या हिऱ्यासोबत आपली भावनिक आठवण आहे असे सांगत बाकाखाली तर फरशीवर हा हिरा शोधण्याचा प्रयत्न केला तसेच अनेक सुरक्षारक्षक देखील या कामी त्यांना मदत करत होते मात्र हा हिरा सापडला नाही त्यामुळे ते प्रचंड निराश झाले असून या हिऱ्यासोबत आपल्या भावनिक आठवणी आहेत असे देखील ते म्हणाले. ज्या अंगठीतून हा हिरा हरवलेला आहे ती प्रेमशंकर प्रसाद यांच्या पत्नीने साखरपुड्याच्या वेळी त्यांच्या बोटात घातली होती त्यामुळे या अंगठीत त्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत मात्र विरोध करायच्या नादात अंगठीतून हिरा निसटला आणि हरवला त्यामुळे ते व्यथित झालेले आहेत.