प्रेमविवाह करून फक्त तीन महिने झाले होते , ‘ असं काही ‘ होईल याची..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक खळबळजनक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नाशिक येथे समोर आलेली असून तीन महिन्यापूर्वी प्रेमविवाह केल्यानंतर विवाहित महिलेने सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकार लक्षात येताच सासरच्या लोकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.

उपलब्ध माहितीनुसार, गौरी मयूर भावसार असे या विवाहितेचे नाव असून सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे असा आरोप माहेरच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. गौरी हीचा अवघ्या तीन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता त्यानंतर ती जुने नाशिक येथील खैरे गल्लीतील दीक्षित चाळ येथे राहत होती. तिने गळफास घेतल्याचे लक्षात येताच सासरच्या लोकांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता.

रविवारी दुपारी गौरीसह इतर माहेरच्या नातेवाईकांनी अमरधामच्या प्रवेशद्वारावरच जोराने हंबरडा फोडत या आत्महत्येसाठी सासरचे लोक जबाबदार आहे असा आरोप केला. जोपर्यंत सासरच्या लोकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही असे देखील त्यांनी भूमिका घेतली होती त्यानंतर पोलिस सासरच्या काही लोकांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


शेअर करा