दोन मुलांची आई ‘ मिसकॉल ‘ देणाऱ्यासोबत फरार , आता म्हणतेय की ?

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाइल आलेला असून अनेकदा या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचे देखील फोन येतात आणि त्यातून देखील प्रेमप्रकरणे फुलतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील अशा प्रेमाच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. उत्तर प्रदेश मध्ये आता हद्द झालेली असून एका मिस कॉलवर प्रेम फुलल्यानंतर एक विवाहित महिला प्रियकरासोबत फरार झालेली आहे.

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे ही घटना घडलेली असून सदर महिला मध्यप्रदेशातील येथील मूळ रहिवासी असल्याचे समजते. आपल्या पतीसोबत ती फिरोजाबाद येथे राहत असताना त्यांना दोन मुले देखील झालेली होती त्यानंतर आपल्या पत्नीच्या संपर्कात राहावे म्हणून या पतीने तिला मोबाईल घेऊन दिला आणि त्यानंतर तिला एकदा मोबाईलवर मिस कॉल आला.

मिसकॉल पाहिल्यानंतर या महिलेने त्या नंबरवर फोन केला आणि त्यानंतर तिची ओळख एका तरुणाशी झाली. त्यांच्यात बोलणं सुरू झाल्यानंतर त्यांची मैत्री झाली आणि अवघ्या काही महिन्यात या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. सदर महिलेच्या पतीला या प्रकरणाची कल्पनाच नव्हती मात्र 16 सप्टेंबर रोजी ही महिला प्रियकराच्या ओढीने पळून गेली.

सदर तरुणाने तिला त्याच्या रसुलपूर येथे असलेल्या घरी ठेवले आणि त्यांनी तिथे विधीपूर्वक लग्न केले. दुसरीकडे हतबल झालेला पती तिचा शोध घेत होता. पोलीस तपास सुरू असताना तिच्या प्रियकरासोबत फिरोजाबाद येथे राहत असल्याचे समोर आले आणि पोलिसांनी तिथे दाखल होत तिला ताब्यात घेतले. सदर महिला ही आता पहिल्या पतीकडे जाण्यास तयार नसून प्रियकरासोबत यापुढील आयुष्य आपण व्यतीत करणार आहोत असे पोलिसांना सांगितले आहे. सदर महिला आणि तिचा प्रियकर हे वयस्क असून समुपदेश करूनच मार्ग निघेल असे पोलिसांनी त्यांना सांगितले आहे.


शेअर करा