महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यासाठीच सत्तांतर केलंय , बड्या नेत्याचा दावा

शेअर करा

राज्यातून टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलेला असून राज्याचे प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्याच्या उद्देशाने राज्यात सत्तांतर घडवण्यात आले, असा गंभीर आरोप करण्यात केलेला आहे

सुभाष देसाई म्हणाले की, सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेलेले आहेत आणि ते सर्व प्रकल्प एकाच राज्यात गेलेले आहेत त्याविषयी शिंदे फडणवीस सरकार एक शब्द देखील काढत नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवण्यासाठी शिंदे सरकार आलेले आहे, ‘ असे देखील ते म्हणाले.


शेअर करा