लग्नानंतर दहा दिवसात पुन्हा गाठला प्रियकर पण आला ‘ विचित्र ‘ अनुभव

शेअर करा

देशात एक खळबळजनक अशी घटना उत्तर प्रदेशात समोर आलेली असून देवरिया परिसरात एक अजब प्रेम प्रकरण उघडकीला आले आहे. एक विवाहित महिला सासर सोडून आपल्या प्रियकराच्या घरी पळून गेली त्यानंतर त्या तरुणाच्या कुटुंबियांनी देखील तिला घरात बंद केले आणि त्यानंतर ते देखील पळून गेले. पीडित महिलेने 112 नंबरवर फोन करून पोलिसांची मदत मागितली.

अवघ्या काही मिनिटात पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून महिलेची सुटका केली त्यावेळी तिने आपण ज्याच्या घरी पळून आलो आहोत त्याच्या सोबत आपण जुलै 2019 मध्ये एका मंदिरात लग्न केले होते मात्र त्यानंतर तरुणीच्या कुटुंबीयांनी तीच दुसरीकडे लग्न लावून दिले. लग्नाच्या दहा दिवसानंतर तिचा प्रियकर तिला पळवून घेऊन गेला आणि त्यानंतर ते दोघे वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहत होते.

दरम्यानच्या काळात तरुणीला दिवस गेले आणि तरुणाच्या कुटुंबीयांनी तिच्यावर दबाव टाकत तिला गर्भपात देखील करण्यास भाग पाडले. तिच्या प्रियकराने काही दिवसांपूर्वी तिच्या मोबाईलमधील त्यांचे सर्व फोटो डिलीट केले होते आणि प्रिंट काढलेले फोटो जाळून टाकले होते त्यानंतर त्याने तिचा मोबाईल नंबर देखील बदलला आणि तिच्यासोबत संपर्क तोडून टाकला.

तरुणीने म्हटले आहे की आपण त्याच्याकडे अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने प्रत्येक वेळी आपल्याला टाळले त्यामुळे ती अखेर हतबल झाल्याने त्याच्या घरी दाखल झाली मात्र ती घरात आल्यानंतर एक एक करत घरातील व्यक्ती बाहेर पडली आणि अखेर तिला कोंडून सर्व जण फरार झाले. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही परिवारांना बोलावून समजुतीने वाद मिटवण्याचे आवाहन केलेले आहे.


शेअर करा