सोशल मीडियात ‘ ह्या ‘ विवाहाची चर्चा होण्याचे आहे खास कारण

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू असून साउथ फिल्म इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मी हिने निर्माता रवींद्र चंद्रशेखर यांच्यासोबत लग्न केलेले आहे. निर्माता असलेले रवींद्र चंद्रशेखर यांचे त्यांच्या पत्नीसोबत काही फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालेले असून त्यांच्या या फोटोवर अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामध्ये महालक्ष्मी हिने हे लग्न केवळ पैशासाठी केले आहे अशा देखील अनेक कमेंट त्यांच्या या फोटोवर येत आहेत.

त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आणि मोठ्या प्रमाणात वायरल झाले. निर्माते असलेले रवींद्र चंद्रशेखर हे त्यांच्या लठ्ठपणामुळे चर्चेत आलेले असून महालक्ष्मी हिने त्यांच्यासोबत केवळ पैशासाठी लग्न केले असे अनेक जणांनी काही जणांनी म्हटले आहे तर एका व्यक्तीने चक्क मोटू पतलू की जोडी अशी देखील टीका केली आहे सोबतच जर पैसा असेल तर काहीही होऊ शकते असे देखील अनेकांनी म्हटले आहे

अभिनेत्री महालक्ष्मी हिचे पहिल्या पतीसोबत वाद सुरू झालेले होते त्यानंतर तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला आणि निर्माता रवींद्र चंद्रशेखर यांच्यासोबत लग्न केले. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांची ओळख झाली होती त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि रवींद्र यांच्याशी लग्न केल्यानंतर महालक्ष्मी हिने मी भाग्यवान आहे असे म्हटलेले आहे. रवींद्र यांनी महालक्ष्मीसोबत फोटो शेअर केला होता त्यावेळी त्याला ‘ माझ्या आयुष्यातले आठवे आश्चर्य ‘ असे म्हटलेले होते . रवींद्र चंद्रशेखर यांच्या या फोटोवर महालक्ष्मी हिने माझ्या हृदयाची धडधड जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यावर प्रेम करेल असे म्हटलेले आहे. रवींद्र चंद्रशेखर यांचे वजनदार व्यक्तिमत्व आणि अत्यंत देखणी असलेली महालक्ष्मी यांच्या या फोटोवर दुर्दैवाने अनेक वेगवेगळ्या कमेंट येत आहेत.


शेअर करा