‘ त्या ‘ तरुणीचा मृतदेह सापडताच गावात दुसरी एक आत्महत्या : सस्पेंस कायम ?

शेअर करा

गेल्या तीन दिवसापासून ती बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केली होती. अखेर तिचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. राजस्थानच्या झुंझनू जिल्ह्यातील खेतडी नगर परिसरात बुधवारी तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह एका विहिरीत सापडताच गावातीलच एका तरुणाने दुसऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. श्लोलपुरा गावात ही घटना घडली. या घटनेचा परस्पर काही संबंध आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत . मृत तरुणाचे नाव मनीष असे आहे .

उपलब्ध माहितीनुसार, मनीष आणि मयत मुलगी हे दोघेही सरकारी शाळेत १२ वीच्या एकाच वर्गात शिकत होते. बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीविषयी तिच्या घरच्यांनी मनीष याला घरी बोलावून विचारणा केली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते का ? या दिशेनेही चौकशी केली जात आहे. मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात येत असतानाच याची बातमी समजताच मनीषने दुसऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या गावातील सुनीता देवी यांनी आदल्या दिवशीच त्यांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. अनोळखी तरुणाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, कोणताही पुरावा हाती लागला नव्हता. बुधवारी सकाळी गावातील एका विहिरीत मुलीचा मृतदेह आढळला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलीचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून काढण्यात येत होता. त्याचवेळी गावातीलच १८ वर्षीय मनीष याने दुसऱ्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का याची शक्यता देखील पोलीस पडताळून पाहत आहेत.


शेअर करा