45 दिवसानंतर जाग आली का ? राहुल गांधींनी ठणकावले

शेअर करा

राहुल गांधी यांनी अडाणी आणि अंबानी यांचे मोदी यांच्यासोबत संबंध यावर भारत जोडो यात्रेपासून भाष्य करायला सुरू केल्यानंतर भाजपकडून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणण्याचे तसेच टार्गेट करण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. भाजपमधील किरकोळ नेत्यापासून तर केंद्रीय मंत्र्यापर्यंत सर्वच जणांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चा खोललेला असून राहुल गांधी यांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरू केलेले आहे.

भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांना काही महिला भेटल्या आणि त्यांनी आपल्यावरील अत्याचारासंदर्भात त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडलेले होते. पोलिसांनी या प्रकरणी खरे तर आरोपींचा शोध घेणे अपेक्षित होते मात्र त्यापेक्षा उलट राहुल गांधी यांनाच या महिला कोण आहेत ? याची माहिती आम्हाला द्या यासाठी राहुल गांधी यांच्या घरी दाखल होऊन महिलांची माहिती मागत आहेत .

राहुल गांधी यांनी आता चार पानांचे लेखी उत्तर पोलिसांना सोपवलेले असून त्यामध्ये , ‘ 45 दिवसानंतर आता आपल्याला माझ्या वक्तव्याची आठवण झालेली आहे. मला असे वाटते आहे की ज्या पद्धतीने गौतम अडाणी प्रकरणात मी सरकारला प्रश्न विचारत आहे त्यामुळे आपण माझ्या दारात आला आहात. अशा प्रकारे पोलीस माझ्या दारी येणे हे अभूतपूर्व आहे. 45 दिवसांनी राहुल गांधी यांच्या घरी पोलीस दाखल झाल्यानंतर आत्ताशी पोलिसांना जाग आली का ? असा देखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


शेअर करा