दहावीचे पेपर झाल्यावर ‘ त्या ‘ दोघी झाल्या गायब , राहुरीतील घटना

शेअर करा

राहुरी तालुक्यातील एका गावात दहावीचे पेपर झाल्यानंतर दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात तरुणांनी अपहरण केल्याचा प्रकार पंचवीस तारखेला समोर आलेला आहे. 25 मार्च रोजी हा प्रकार घडलेला असून पालकवर्गात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

सदर घटनेतील एक मुलगी पंधरा वर्षांची असून दुसऱ्या मुलीचे वय 16 वर्ष आहे. दोघेही एकाच वर्गात शिकत होत्या. 25 मार्च रोजी दहावीचा पेपर देण्यासाठी त्या शाळेत गेलेल्या होत्या त्यानंतर दुपारी घरी आल्या नाही म्हणून पालकांनी त्यांचा परिसरात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र त्या आढळून आल्या नाही . दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात तरुणांनी त्यांचे अपहरण केले अशी माहिती हाती लागल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवलेली आहे.

मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणांच्या विरोधात भारतीय दंड विधान 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याचे देखील माहिती असून वृत्त लिहीपर्यंत या मुलींचा ठावठिकाणा आढळून आलेला नाही.


शेअर करा