बायकोच्या अनैतिक संबंधांना ‘ ब्रेक ‘ लागेनाच , शेतकऱ्याने मात्र अखेर..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना सोलापूर जिल्ह्यात समोर आलेले असून चुलत भावाबरोबर पत्नीचे अनैतिक संबंध लक्षात आल्यानंतर वारंवार सांगून देखील पत्नीच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने अखेर एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. मोहोळ तालुक्यातील ही घटना असून औंढी इथे खिशात चिठ्ठी ठेवून या शेतकरी व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे सोबतच पत्नी , चुलत भाऊ आणखीन एक महिला आणि पुरुष या चार जणांची नावे चिठ्ठीत लिहिल्यावरून या चौघांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नेताजी हिंदुराव भुसे ( वय 37 वर्ष ) यांचा विवाह चौदा वर्षांपूर्वी सोलापूर येथील शुभांगी नावाच्या तरुणीसोबत झालेला होता. त्यांना दोन मुले असून त्यांची पत्नी असलेली शुभांगी हिचे पांडुरंग नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू झालेले होते. नेताजी यांच्या आई-वडिलांनी तसेच त्यांनी शुभांगी हिला समजावून सांगितले त्यावेळी तिने माझी चूक झाली पुन्हा असे करणार नाही असे कबूल केलेले होते मात्र पुन्हा ती जुन्याच पद्धतीने वागू लागली त्यावेळी गावातील प्रतिष्ठित लोकांनी तिचा प्रियकर पांडुरंग याची देखील कानउघडणी केलेली होती.

पांडुरंग याने देखील गावातील सर्व नागरिकांच्या समोर पुन्हा आपण असे काही वागणार नाही असे सांगितले होते मात्र काही दिवस उलटल्यानंतर त्यांचे संबंध पुन्हा पूर्ववत सुरू झाले. बायकोला सांगून देखील बायको ऐकत नसल्याने अखेर 23 तारखेला सकाळी सहाच्या सुमारास परिसरातील एका शेतात विषारी औषध प्राशन केलेले नेताजी आढळून आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता.

25 तारखेला तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर नेताजी यांचा मुलगा श्रेयस याला त्याच्या वडिलांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आलेली आहे. त्या चिठ्ठीमध्ये नेताजी यांनी मी बायको शुभांगी ,पांडुरंग भुसे ,आप्पा आणि राधाक्का यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त केलेले आहे त्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे लिहिलेले आहे. नेताजी यांचे वडील हिंदुराव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


शेअर करा