‘ ऑपरेशन लोटस ‘ च्या नावाखाली देशाचा आत्माच नष्ट करण्याची भाजपची भूमिका

शेअर करा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा देशाचा आत्मा आहे. ऑपरेशन लोटसच्या नावाखाली देशाचा हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपने घेतलेली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे देशात जातिभेद वाढलेला असून तनावाची परिस्थिती देखील उद्भवत आहे असे मंगळवारी सातारा येथे बोलताना म्हटलेले आहे.

पत्रकार परिषदेत शरद पवार पुढे म्हणाले की , धार्मिक तेढ निर्माण करून परस्परांना लढविण्याचे पाप भाजपने केलेले आहे. काहीही करून सत्ता मिळवणे आणि ती मिळत नसेल तर सत्ता संघर्ष वाढवणे अशी भाजपची आता नीती झालेली आहे आणि याच नीतीचे प्रयोग देशभरात सुरू आहे.

शरद पवारांना राजकीय वारसदार तयार करता आला नाही या ठीकेबद्दल उत्तर देताना शरद पवार पुढे म्हणाले की, ‘ आम्ही काय केलेले आहे हे त्यांना माहीत नाही. आमचे एक वैशिष्ट्य आहे की पक्षाचे सर्व सहकारी आम्ही एकमेकांशी बोलतो त्यावर मतांमध्ये बदलही असतात मात्र त्याची बाहेर जाऊन प्रसिद्धी करत नाही कारण हा आमच्या पक्षाचा आणि कुटुंबाचा प्रश्न असतो. नवीन नेतृत्वाची फळी कशी तयार होते याची काळजी पक्षाच्या सदस्यांना असून त्यांनी जे काही लिहिलेले आहे त्याचे महत्त्व आमच्या दृष्टीने काहीही नाही. लिहिणं त्यांचा अधिकार आहे त्यांनी तो बजावला आहे आम्ही काय करतो याची त्यांनी चिंता करू नये. ‘


शेअर करा