तब्बल वीस किलोमीटर पाठलाग करून नवरीनं त्याला ‘ लग्नाला बांधलं ‘

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या एका नवरीची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही घटना आहे. नवरी मंडपात नवरदेवाची वाट पाहत होती घरातील सर्व लोक लग्नाची तयारी करत होते मात्र ऐन वेळेस नवरदेव पळून जाण्याविषयी कुणकुण कानी आली आणि नवरदेवाला आणण्याच्या आत त्याने पलायन केले. नवरदेव पळून गेल्यानंतर नवरीने आक्रमक भूमिका घेतली आणि तब्बल वीस किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडले आणि मंदिरात लग्नासाठी आणून बसवले आणि त्यांचा विवाह पार पाडला.

उत्तर प्रदेशातील बरेली येथील ही घटना असून या तरुणीचे अडीच वर्षांपासून बदायू जिल्ह्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू होते. त्यांनी लग्न करण्याचे ठरवले त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी अखेर एकत्र येऊन लग्नाची तारीख देखील ठरवली आणि भूतेश्वरनाथ मंदिरात हा विवाह पार पडणार होता त्यासाठी तरुणी जय्यत तयारी करून तिथे पोहोचली होती .

तरुणी लग्नासाठी आलेली आहे हे लक्षात आल्यानंतर नवरदेवाचे मन बदलले आणि त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला आणि तिथून पळून गेला . नवरीला याची माहिती समजल्यानंतर तो कुठे गेलेला असू शकतो याचा तिला अंदाज घेतला आणि तिने तब्बल वीस किलोमीटर जाऊन आखेर त्याला पकडून आणले त्यावेळी तो आपण आपल्या आईला आणण्यासाठी बदायू येथे चाललो आहे असे सांगत होता.

नवरदेव लग्न करण्यास टाळाटाळ करत आहे हे लक्षात आल्यानंतर तिने आक्रमक धोरण अवलंबले आणि त्यानंतर तिने त्याला वीस किलोमीटरवरून पकडून अखेर मंदिरात आणले आणि भूतेश्वरनाथाच्या समोरच त्यांचा विवाह पार पाडला. या सर्व घटनेत तब्बल दोन तास लग्नाला उशीर झाला मात्र अखेर हा विवाह पार पडला असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे.


शेअर करा