हृदयद्रावक..सरस्वती गेल्या अन काही तासात आजोबांनी प्राण सोडले

शेअर करा

पती आणि पत्नी यांच्यातील नात्यात किती गोडवा असतो याची प्रचिती देणारी एक घटना लातूर इथे समोर आलेली असून वयाचे शंभरी पार केल्यानंतर देखील आपल्या पत्नीवरील प्रेम अधोरेखित करणारी तसेच मनाला चटका लावणारी एक घटना समोर आलेली आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत पतीचा देखील मृत्यू झालेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदाशिव शामराव जाधव ( वय 105 ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून त्यांची पत्नी सरस्वती ( वय 95 ) यांचे निधन झालेले होते त्यांचे निधन झाल्याचे समजताच सदाशिव जाधव यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या आणि अवघ्या काही तासांच्या आत त्यांचादेखील मृत्यू झाला. एकाच वेळी पती-पत्नीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यानंतर पंचक्रोशीतले नागरिक यांचे देखील डोळे पाणावलेले होते.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात होळी या गावात ही घटना घडलेली असून सुमारे 75 वर्षांपूर्वी निलंगा तालुक्यातील जयवंतराव धुमाळ यांची मुलगी असलेल्या सरस्वती यांचा सदाशिव यांच्यासोबत विवाह झालेला होता. लग्नानंतर सरस्वती यांनी आपल्या प्रेमळ स्वभावाने सासरच्या व्यक्तींची मने जिंकली आणि कुटुंबाचा गाडा समर्थपणे ओढलेला होता . आजही त्यांच्या कुटुंबात 32 जण एकत्र राहत असून सरस्वती जाधव यांनी समर्थपणे सर्व कुटुंब एकोप्याने वाढवलेले होते .

सरस्वती यांना एक वर्षांपूर्वी अर्धांग वायू झालेला होता त्यानंतर त्या अंथरुणाला खेळल्या त्यावेळी सदाशिवराव देखील खचून गेलेले होते मात्र त्यांनी आपले दुःख कुटुंबासमोर कधीही मांडले नाही उलट ते कुटुंबाला लढण्याची ताकद देत होते मात्र सरस्वती यांचे निधन झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांच्या आत सदाशिव यांनी देखील शेवटचा श्वास घेतल्याने कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे.


शेअर करा