‘ तू मला समजून घेतले असतेस तर ही वेळ आलीच नसती ‘ चिठ्ठी लिहून विवाहितेची आत्महत्या

शेअर करा

‘ तू मला समजून घेतले असतेस तर ही वेळ आलीच नसती ‘ अशी चिठ्ठी लिहून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात घडली आहे. शहरातील पाग रानडे आळी येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. ( Married woman commits suicide by writing a letter )

प्रीती संदेश गोरीवले ( वय 25 पाग रानडे आळी ) असे या विवाहितेचे नाव असून ती आपल्या पती व दोन मुलांसह माहेरी राहत होती. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रीती आपल्या आईसोबत चालण्यासाठी घराबाहेर पडली तेथून घरी आल्यानंतर वरच्या मजल्यावर आपल्या खोलीत गेली. काही वेळाने तिची आई वरच्या मजल्यावर तिला बोलवण्यासाठी गेली असता प्रतिसाद दिला नाही तसेच आतून दरवाजा बंद होता. बराच वेळा आवाज देऊनही प्रीती कडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर प्रितीच्या आईने प्रीतीच्या भावाला बोलवून दरवाजा तोडला असता तिने सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. तिचे सासर पाग इथेच असून संदेश गोरीवले याच्याशी तिचा प्रेमविवाह झाला होता. या घटनेची फिर्याद तिचा भाऊ ओंकार राजेंद्र सावंत यांनी दिली असून अधिक तपास सुरू आहे


शेअर करा