तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही , छगन भुजबळ यांचा जोरदार हल्लाबोल

शेअर करा

मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षणासाठी राज्यभरात मराठा आंदोलकांचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी कठोर शब्दात टीका केलेली आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथील सभेच्या वेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना भाषेची मर्यादा ओलांडल्याने छगन भुजबळ यांच्यावर देखील सोशल मीडियात निशाणा साधला जात आहे .

काय म्हणाले छगन भुजबळ ?

आमची लेकरंबाळं आमची लेकरंबाळं… मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का रे बाबा… भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो पण स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही .

आरक्षणाच्या मुद्द्यावर इंद्रा साहनी केस झाली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं प्रत्येक राज्याचा आयोग निर्माण करायचा आणि त्या माध्यमातून आरक्षण द्यायचं. 16 नोव्हेंबर 92ला हे अधिकार राज्य आणि केंद्राकडून काढून घेतले. त्यानंतर ते आयोगाकडे गेले. मराठा आरक्षणासाठी त्यावेळीही आंदोलने झाले. खत्री आयोगापासून अनेक आयोगांनी सांगितलं आरक्षण देता येणार नाही. आमचा दोष आहे. आम्ही काय केलं. आम्हाला तर घटनेनं दिलं. बाबासाहेबांनी दिलं. मंडल आयोगाने दिलं. नऊ न्यायाधीशांनी त्यावर शिक्का मारला यांना काहीच माहीत नाही .

हे आरक्षण गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. आज 75 वर्ष झाली दलित समाजाला संविधानाने आरक्षण दिलं. एसपी झाले, कलेक्टर झाले, आयएएस झाले… पण आजही या झोपडपट्ट्यातून आमचे गोरगरीब दलित बांधव राहतो. गरीबी दूर झाली नाही. ओबीसींचीही गरीबी दूर झाली नाही. हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. जे वर्षानुवर्ष पिचलेले आहेत. दबलेले आहेत. त्यांना वर आणण्यासाठी दिलेलं हे आरक्षण आहे. हे आरक्षण म्हणजे काय आहे हे तर समजून घ्या .

मराठा समाजाला काही मिळत नाही असं आहे का ? चंद्रकांत पाटील समिती आणि इतरांनी दिलेला रिपोर्ट पाहा. मराठ्यांच्या योजनांसाठी कोट्यवधी रुपये वाटण्यात आले आहेत . मोदींनी दिलेलं १० टक्के आरक्षणात ८५ टक्के मराठा समाजाचे लोक आहेत. ६० टक्क्याच्यावर ४० टक्के आरक्षणात मराठा आहे. आमच्या २७ टक्क्यात कुणबीही आहे. तुम्हाला नाही असं नाही. मराठा विद्यार्थ्याला वस्तीगृह नसेल तर ६ हजार रुपये ते मिळते ते ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही. १० ते ११ हजार कोटी वाटले आहेत. ओबीसी महामंडळ आधीपासून आहे त्याला हजार कोटीही दिले नाही. द्या हिशोब. तुम्हाला हवंय घ्या. पण आमचं काय ? द्या ना आम्हाला , असेही ते पुढे म्हणाले .


शेअर करा