पोहण्यासाठी म्हणून गेले ‘ ते ‘ आलेच नाहीत , अहिल्यानगरमधील घटना

शेअर करा

पोहण्यासाठी म्हणून गेलेल्या दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहिल्यानगर तालुक्यातील आलमगीर परिसरात घडली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अजमत जावेद शेख ( वय तेरा वर्ष राहणार आलमगीर नागरदेवळे )  आणि मोहम्मद साद अन्सारी ( वय 16 वर्ष राहणार भिंगार ) अशी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. 

नागरदेवळे येथील ब्रह्मतळे परिसरात दोघेही पोहण्यासाठी गेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आर्मी सैनिकांचा तिथे कॅम्प सुरू होता त्यावेळी एका सैनिकाच्या ही  बाब लक्षात आली आणि तात्काळ तलावाजवळ धाव घेत दोघांना पाण्यातून बाहेर काढले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र दोघांचाही मृत्यू झालेला होता .


शेअर करा