महाराष्ट्रात एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना नागपूर येथे समोर आलेली असून लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रेमविवाह केलेल्या एका दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. मूल होत नसल्याच्या कारणावरून हे दांपत्य गेल्या अनेक वर्षांपासून निराश होते.
उपलब्ध माहितीनुसार , टोनी आणि ॲनी जारील मॉनक्रिप अशी पती-पत्नीची नावे असून दोघांनी प्रेमविवाह केला होता पण त्यांना मुलेबाळं नव्हते त्यामुळे दोघांना आयुष्यात नैराश्य आलेले होते. कोरोनानंतर टोनीची नोकरी गेली तेव्हापासून टोनी नैराश्यात गेला. गेल्या दोन वर्षांपासून टोनी कामाच्या शोधात होता. त्यातच मुलबाळं होत नसल्याने दोघे निराशेत गेले. दोघांचा एकमेकांना आधार होता.
ख्रिसमसनंतर दोघेही निराश होते. लग्न वाढदिवशी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी जेवणही केले नाही. सकाळपासून दोघांनी काहीही खाले नाही. अंत्यविधीसाठी घरात 75 हजार रुपये ठेवले. चिठ्ठीत आत्महत्या करण्याचे नमूद करत दोघांनी नातेवाईकांची माफी मागितली.
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्टीननगरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सकाळचे 10 वाजले तरी दोघेही बाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा वाजवला. पण प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून डोकावून पाहिले असता दोघेही गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले.