‘ कव्वाली वाजवणारे ,’ संग्राम जगताप यांचीही भाषा बदलत चाललीय कारण.. 

शेअर करा

राष्ट्रवादीचा अजित पवार गट सध्या एनडीएचा भाग झाल्यानंतर प्रतिनिधींची देखील भाषा बदललेली पाहायला मिळत आहे. नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ‘ कव्वाली वाजवणाऱ्यांचा कार्यक्रम वाजला ‘ असे एका कार्यक्रमात म्हटलेले आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या या वक्तव्यानंतर कवाली वाजवणारे नक्की कोण ? प्रतिस्पर्धी उमेदवार की एका विशिष्ट समाजाचे लोक याची चर्चा सध्या नगरमध्ये आहे. सारसनगर परिसरात राधाकृष्ण मंदिरात सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

आमदार संग्राम जगताप यावेळी म्हणाले की ,’ अनेक वर्षांपासून नगर शहरात राजकारण करीत आहे. परंतु, आतापर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीत कधीही कव्वाली वाजवली गेली नाही. इतिहासाची पाने उलटून पाहिली तर असे कधीही झालेले नाही. परंतु 2024 मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत काहींनी कव्वाली वाजवली. लोकसभेनंतर काही लोक मतांसाठी लाचार झाले होते त्यामुळेच गणपती विसर्जन मिरवणुकीत कव्वाली वाजवल्या गेल्या परंतु त्या कव्वाल लोकांना विधानसभा निवडणुकीत मतदानातून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे .’ 

आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, ‘ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार महाविकास आघाडीतून महायुतीत सामील झाले. राज्यात पुन्हा महायुतीचे हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल उलटासुलटा लागला. त्यावेळी काही लोक समृद्धी महामार्गाने मागण्या मान्य करण्यासाठी मुंबईकडे गेले. परंतु, त्यावेळी महामार्गावर ज्या ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे नाव होते ते पुसण्याचे काम जिहादी लोकांनी केले. लोकसभेनंतर हिरवा गुलाल उधळण्याचे काम केले. लोकसभेला लोक चुकले, त्याचे परिणाम सहा महिने जनतेला भोगावे लागले आहेत ,’ . 

आमदार संग्राम जगताप यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, उद्योजक सागर मुर्तडकर, यशवंत गारडे, हभप झुंबर आव्हाड, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष बापू ठाणगे, भाऊसाहेब सिनारे, प्रवीण गुुंजाळ आदींसह मोठ्या संख्येने अन्य नागरिक उपस्थित होते.


शेअर करा