दम आहे म्हणून तर दोन दोन सांभाळतो अन रोखठोक बोलतो , सुरेश धस यांचा हल्लाबोल

शेअर करा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. 

सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे अशा ७ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आता या प्रकरणावरुन भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे

काय म्हणाले सुरेश धस ? 

ऍट्रॉसिटी दाखल करू नका म्हणून ज्या आकाने कॉल केला त्याला आरोपी करा. काही लोक आधी म्हणतात मी असं करेन, तसं करेन. पण जेव्हा बिन भाड्याच्या खोलीत गेले की सगळे गार होतात. मुख्यमंत्री साहेबांनी आमचं सगळं ऐकले आहे. मोक्का लावतो म्हणाले तो ही लावला. आता 7 जणांना मोक्का लागलाय, पण राहिलेल्या बोकाला पण मोक्का लागला पाहिजे

या गुन्ह्यातील 7 आरोपींना अटक झाली आहे. एकाला अजून अटक झालेली नाही. एवढी भयाण परिस्थिती असूनही गुन्हे दाखल होत नाहीत. आकाने महासंस्कृती कार्यक्रम घेतला आणि 10 लाख खर्च केला. पण याचा खर्च 5 कोटी दाखवला. महासंस्कृती कार्यक्रमाचे टेंडर मुंबईच्या कंपनीला दिले होते. पण वाल्मिकने परभणीच्या मिनाज नावाच्या व्यक्तीला टेंडर दिले. अनेकजण म्हणतात की वाल्मिकला ईडीला नोटीस येत नाही. पण ही घ्या ती नोटीस… 2/2/2024 ची आहे.

आमच्या टिंब टिंब मध्ये दम आहे का असे म्हणतात अरे दम आहे म्हणून तर बोलतो आणि दम आहे का नाही हे मोजायचं कसं ?  दम आहे म्हणूनच दोन दोन सांभाळतो आणि प्रत्येकीला तीन तीन मुले आहेत ,’ असे म्हणत सुरेश धस यांनी यांच्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलेले आहे. 


शेअर करा