हनीमूनच्या आधीच नवरदेव गायब झाल्याने नवऱ्या मुलीची ‘ अशी ‘ झाली अवस्था…

शेअर करा

लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेव गायब झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील पिलभीत इथे घडली असून त्याच्या रहस्यमय गायब होण्याचे कारण अद्याप देखील उघडकीस आले नाही तर नवरीने मात्र पूर्ण घर डोक्यावर घेतले आहे .लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मधुचंद्रापूर्वी नवरदेव गायब झाला आहे. तो कुठे गेला किंवा कोणी अपहरण केलं, हेही कळायला मार्ग उरला नाही. नातेवाईकांनी तब्बल 24 तास शोध घेतल्यावर कोणताही सुगावा हाती लागला नाही.त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवरदेव अचानक गायब झाल्यामुळे नवरीने रडून रडून सारं घर डोक्यावर घेतले आहे. गायब झालेला वर हा गावचा प्रमुखही आहे. सध्या कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यावरून तक्रार नोंदवली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. हे संपूर्ण प्रकरण बिलसंडा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. सिसैइया साहब गावात राहणारे लोकेंद्र यादवही या गावचे प्रमुख आहेत. लोकेंद्रचं लग्न 9 डिसेंबर रोजी झालं होतं. अगदी वाजत गाजत मोठा लवाजमा घेऊन हे लग्न आनंदानं पार पडलं होतं. 10 डिसेंबरला लोकेंद्र वधूला घेऊन आपल्या घरी आला मात्र दोन दिवसातच तो गायब झाल्याने परिसरात हा प्रकार मोठा चर्चेचा विषय झाला आहे .

लग्नाच्या रात्री अकराच्या सुमारास लोकेंद्रने दोन लोकांना फोन केला होता. फोनवर बोलल्यानंतर लोकेंद्र घराबाहेर पडला आणि परत आलाच नाही. लग्नाच्या घरात नवरदेव अचानक गायब झाल्याने अनागोंदी निर्माण झाली. नातेवाईकांनी रात्रभर नवरदेवचा शोध घेतला. खूप प्रयत्न करूनही त्यांना काहीही सापडलं नाही. त्यामुळे पहाटेच कुटुंबीय तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला पोहचले. नवरदेवाचा मोठा भाऊ जोगेंद्र यानं नवरदेव बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक दृष्टीकोनातून याप्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. त्यासाठी अनेक नातेवाईकांचे जबाबही नोंदवले आहेत.


शेअर करा