बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला जात आहे या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी महाजन यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी सारंगी महाजन यांनी सोळा वर्षांपूर्वीच्या दिवसांची आठवण काढलेली आहे.
काय म्हणाल्या सारंगी महाजन ?
आज मला त्यांच्याकडून बघून माझे जुने 16 वर्षांपूर्वीचे दिवस आठवले, जरी हे ग्रामीण भागात राहत असेल तरी त्यांचं आणि माझ दुःख एकच आहे. मी एकटी लढाई लढले आणि त्यांच्यासोबत त्यांचं गाव आहे हाच काय तो फरक आहे. मी 11 वर्षे समाजासोबत काम करते. ग्रामीण भागातील गरिबाचं काय दु:ख असतं हे मला माहीत आहे. माझं दु:ख ही यापेक्षा वेगळं नाही. फरक एवढाच आहे की मी माझं दु:ख मागे टाकून मुलांना चांगलं शिक्षण दिलं. आज यांचे लहान लेकरं बघून मला खूप वाईट वाटतं. यांच्यासाठी मला काही करता आलं तर मी नक्की करणार आहे .
माझी जमीन आंबेजोगाईला आहे, तीची केस लढत आहे. त्या जमिनीतून मला त्यांना काही देता आलं तर मी ते त्यांना नक्की देणार आहे. हे दोघेही बहीण भाऊ इथे येत नाहीत यातच समजून जा यांचे किती हात बरबटले आहेत. माझ्या केसमध्ये गोविंद बालाजी मुंडे त्याचे ते टोळभैरव त्याच्यासोबत वाल्मिक कराड याचं कनेक्शन, वाल्मिक कराडचं कनेक्शन धनंजय मुंडेंसोबत म्हणजे धनंजय मुंडे सुद्धा यामध्ये मिक्स आहे आणि पंकजा मुंडे या देखील यामध्ये मिक्स आहेत. हे सगळे लोक आहेत ना ते सगळे बीडचं नाव बिहारसारखं खराब करू लागले आहेत .