नगर जिल्ह्यात एक धक्कादायक अशी घटना शिर्डीत घडलेली असून शिर्डी संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची अडवून अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली आहे तर आणखीन एक व्यक्ती देखील हल्ल्यात जखमी झाला आहे. विशेष बाब म्हणजे तीन वेगवेगळ्या ठिकाणी अवघ्या एक तासांच्या आत घडलेल्या असून शिर्डीत यामुळे खळबळ उडालेली आहे .
शिर्डीत आज पहाटेच्या सुमारास सुभाष साहेबराव घोडे आणि नितीन कृष्णा शेजुळ हे साई संस्थानमध्ये निघाले होते त्यावेळी आरोपींनी वाटेत अडवून त्यांची निर्घृण हत्या केली तर आणखीन एका हल्ल्यात कृष्णा देहरकर हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर श्रीकृष्णनगर भागात हल्ला झाला आहे .
खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी देखील याप्रकरणी संताप व्यक्त करत,’ पोलिसांना अपघात आणि खून यातील फरक कळत नाही, त्याला पोलिसात राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. पोलीस निरीक्षक यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येतील ‘ असे म्हटलेले आहे.
खासदार डॉक्टर सुजय विखे पुढे म्हणाले की ,’ मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय. त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. आम्ही जे बोललो होतो, ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो, ते महाराष्ट्रला कळेल. हे प्लान मर्डर वाटत नाहीत, नशेमध्ये होत असलेले रँडम मर्डर आहेत . व्हाईटनर जे नशा करतात ती ही मुलं असावित. वेगवेगळ्या लोकेशनला जो सापडला, त्याच्यावर हल्ला करून त्याच्याकडून पैसे काढण्याच हे कृत्य आहे. हे नशेखोरांचं कृत्य आहे दुपारपर्यंत हे आरोपी ताब्यात असतील. साडेपाचला पोलिस कर्मचा-याला फोन केला, त्या कर्मचाऱ्याने तो अपघात सांगितला. त्याला सस्पेंड केलं जाईल. त्याला मर्डर आणि अपघातातला फरक कळत नाही त्याला पोलीस स्टेशनमध्ये राहणायाच अधिकार नाही .’