तसा ‘ हा ‘ देखील जुमला असू नये , आतापर्यंत एकदाही मोदींनी.. 

शेअर करा

जातीनिहाय जनगणना करण्याची केंद्र सरकारने घोषणा केलेली असली तरी या घोषणेच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची भाषा करणारे मोदी यांनी आतापर्यंत एकदाही जातीनिहाय जनगणना या मोठ्या निर्णयावर जनतेच्या समोर येऊन भाष्य केलेले नाही त्यामुळे जातीनिहाय जनगणना कितपत प्रभावी आणि वेळेत होईल याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. पाकिस्तानच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी तर ही घोषणा केली नाही ना अशीही सोशल मीडिया चर्चा आहे. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ,’ जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयापाठीमागची पार्श्वभूमी पाहिली तर राहुल गांधी यांचा हा मोठा विजय आहे. सरकारचे अनेक जुमले आपण पाहिलेले आहेत तसा हा देखील जुमला असू नये ,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे बोलताना ,’ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काही खासदार यांनी जातीनिहाय जनगणना नकोच असे म्हटलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर हा अर्बन नक्षलवाद आहे असेही म्हटलेले होते. महायुती सरकारने पहिल्या शंभर दिवसाचे रिपोर्ट कार्ड सादर केले मात्र शंभर दिवसात जनतेचा त्यांच्याकडून अपेक्षाभंग झालेला आहे ,’ असेही सपकाळ पुढे म्हणाले. 


शेअर करा