… अन्यथा टिकटॉक पाठोपाठ व्हाट्सएप्पदेखील भारतातून गाशा गुंडाळणार ?

शेअर करा

केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदत घेत सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रविशंकर प्रसाद यांनी यावेळी विविध मुद्दे मांडले पण यातील एक मुद्दा व्हॉट्सअॅपसाठी मोठा आघात ठरू शकतो आणि केंद्र सरकार अडूनच राहिले तर भारतातील व्हाट्सऍप आणि टेलिग्राम देखील बंद होऊ शकते.

रविशंकर प्रसाद म्हणाले की, “सोशल मीडियात भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारतोय हे चांगलंच आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात व्यवसाय करावा. त्याचं स्वागत आहे. पण त्याचा गैरवापर व्हायला नको. आमच्याकडे अनेक तक्रारी येतात. संसदेत आणि सुप्रीम कोर्टातही हा विषय पोहोचला आहे. यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू करण्यात येणार आहेत ‘ सोशल मीडियासाठीच्या मार्गदर्शन सूचनांपैकी एक महत्वाची सूचना केंद्रानं केली आहे. ती म्हणजे सोशल मीडियावर एखादा गैरप्रकार घडल्यास त्याची सुरुवात कुणी केली याची माहिती कंपनीला द्यावी लागेल. सरकारची हीच सूचना WhatsApp साठी सर्वाधिक डोकेदुखी ठरणारी आहे .कारण कसे ते समजून घेऊयात

WhatsApp ने याआधीच आमचं प्लॅटफॉर्म हे ‘एण्ड टू एण्ड इन्स्क्रिप्टेड’ (end to end encryption) असल्यानं मेसेज कुणी केलाय किंवा नेमकं काय संभाषण झालं हे सांगणं अशक्य असल्याचं म्हटलं आहे. कारण एकमेकांना पाठवलेले मेसेज इन्स्क्रिप्टेड असल्याने व्हाट्सअँप देखील ते वाचू शकत नाही त्यामुळे आक्षेपार्ह मेसेजचे मूळ उगमस्थान शोधणे हे अशक्य आहे आणि इन्स्क्रिप्टेड सुविधा काढून टाकावी तर सर्व मेसेज हे व्हाट्सअँपसह सरकारी यंत्रणादेखील वाचू शकतात, म्हणजेच लोकांच्या प्रायव्हसीचा कोणतीच काळजी घेणे व्हाट्सअँपला शक्य होणार नाही याचा मोठा फटका व्हात्साप्पला जागतिक पातळीवर देखील बसू शकेल मात्र आपले मेसेज त्रयस्थ यंत्रणा वाचत असल्याने सरकार आणि व्हाट्सअँप एका मार्गाने हेरगिरीच करत असल्याने किती लोक वापरतील, हा देखील एक प्रश्नच आहे.

व्हाट्सएप्प हे युझर्सच्या वैयक्तिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एण्ड टू एण्ड इन्स्क्रिप्टेड प्रणालीवरच आमचं व्यासपीठ कार्य करतं, असं WhatsApp ने जाहीर केलं होतं, मात्र आता इन्स्क्रिप्टेड प्रणालीवर काम करणे व्हाट्सएप्पसाठी शक्यच होणार नाही. केंद्र सरकारने याआधीही WhatsApp कडे व्हायरल आणि फेक मेसेजेसची सुरुवात कुठून होते याची माहिती देण्यासाठीची मागणी केली होती. पण ते शक्य नसल्याचं WhatsApp नं स्पष्ट केलं होतं. त्यावरुन WhatsApp आणि केंद्र सरकारमध्ये वादही झाले होते. केंद्र सरकार आता मेसेजसचं उगम स्थान माहित करुन घेण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे त्यामुळे कदाचित टिकटॉक पाठोपाठ व्हाट्सएप्प देखील भारतातून काढता पाय घेऊ शकते.इन्स्क्रिप्टेड प्रणाली केवळ भारतातून काढून घेतली तर जागतिक पातळीवर व्हाट्सएप्पच्या नावाला मोठा फटका बसू शकेल .

WhatApp नं तांत्रिकदृष्ट्या दोन संभाषणांमधली माहिती काढून घेणं अशक्य असल्याचं याआधी देखील म्हटलं आहे. त्यामुळे WhatApp नं आता केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना पाळण्यास असमर्थता दाखवली तर पुढे काय होणार? भारतात WhatsApp बंद होणार का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.दरम्यान वृत्त लिहीपर्यंत तरी केंद्राच्या नव्या मार्गदर्शन सूचनांबाबत अद्याप WhatsApp कडून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.

WhatsApp हे एण्ड टू एण्ड इनस्क्रिप्टेड प्रणालीवर कार्यरत असल्यानं मूळ मेसेज कुणी शेअर केला याची माहिती मिळवणं कठीण असल्याचं व्हॉट्सअॅपनं म्हटलंय. तर रविशंकर प्रसाद यांनी आज सोशल मीडिया कंपन्यांकडे सरकारनं जर एखाद्या माहितीचा उगम कुठून झाला? याची विचारणा केली तर त्याची माहिती या कंपन्यांना सरकारला द्यावी लागेल असं म्हटलं असल्याने कदाचित व्हाट्सएप्प भारताला रामराम ठोकू शकेल तर टेलिग्राम देखील इनस्क्रिप्टेड प्रणालीवर काम करत असल्याने यापुढे काम करू शकणार नाही.


शेअर करा