पूजाच्या आई वडिलांना संजय राठोडांकडून ५ कोटी रुपये ?, पहा व्हिडीओ

शेअर करा

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर देखील त्यावरून रोज नवीन नवीन माहिती आणि आरोप समोर येत असल्याने प्रकरणातील गूढ वाढत चाललेले पाहायला मिळत आहे. “शिवसेना आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलं आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत”, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे.

पूजाची आजी शांताबाई यांनी व्हिडिओत काय म्हटले आहे ?

पूजाला न्याय मिळावा यासाठी मी पहिल्या दिवसापासून आवाज उठवत आहे. पूजाचे आई-वडील काल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पूजाच्या आई-वडिलांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. पूजाच्या आई-वडिलांना स्वत:च्या लेकराची किंमत नाही. त्यामुळेच त्यांना पूजाच्या हत्याराविषयी बोलायचे नाही आणि पैशामुळे माझे चुलत आजी नातेही त्यांना दिसत नाही. याप्रकरणात आतापर्यंत बंजारा समाजाची दिशाभूल झाली आहे. आता पूजाचे आई-वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही दिशाभूल करत आहेत.

पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडणार नाहीत. संजय राठोड यांच्याकडून मिळालेले पैसे त्यांनी घरातील जमिनीत पुरुन ठेवले आहेत. त्यांच्या घरात जावयांमध्ये वाद सुरु आहेत. सध्या पूजाचे आई-वडील नव्हे तर त्यांना दिलेला पैसा बोलत आहे. या सगळ्याच्या माध्यमातून पूजाचे मृत्यूप्रकरण दडपण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा, ही माझी नम्र विनंती आहे.

काय संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर काय झाल्या घडामोडी ?

पूजा चव्हाणच्या आई-वडिलांनी रविवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र दिलं. हे पत्र परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेदरम्यान वाचून दाखवलं. या पत्रात त्यांनी आमची बदनामी होत असल्याचे म्हटले होते. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दु:खापेक्षा अधिक त्रासदायक आणि आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीचा मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून संजय राठोड यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत, असे पूजाच्या आई-वडिलांनी म्हटले होते.

यापूर्वी शांताबाई राठोड यांनी संजय राठोड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला होता. पूजा चव्हाण हिला गर्भपात झाल्यानंतर यवतमाळमध्येच ठार मारण्यात आले. त्यानंतर पुण्याच्या फ्लॅटवर नेऊन तिला तिसऱ्या मजल्यावरुन खाली ढकलण्यात आले, असा दावाही शांताबाई राठोड यांनी केला होता. त्यासाठी पोलिसांनी 7 ते 21 फेब्रुवारीपर्यंतची परळी शहरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी करावी, अशी मागणीही शांता राठोड यांनी केली होती.


शेअर करा