सद्दाम हुसेनची ‘ अशी ‘ आयडिया वापरून सासू अन मेहुणीला संपवले तर बायको कोमात

शेअर करा

दिल्लीच्या एका रिअल इस्टेट व्यावसायिक वरुण अरोरा यांनी इराकचा तानाशाह सद्दाम हुसेनबाबत इंटरनेटवर वाचलं होतं की तो आपल्या राजकीय विरोधकांना मारण्यासाठी थेलियम नावाचा विषारी पदार्थाचा वापर करत होता. याच थेलियमचा वापर करत दिल्लीतील या व्यावसायिकाने आपल्या सासू आणि पत्नीचा खून करण्याचं ठरवलं.

प्रकरणाचा असा झाला भांडाफोड

सदर व्यक्तीचे सासरे असलेले होमिओपॅथी औषधींचे निर्माता देवेंद्र मोहन शर्मा हे पोलिसांकडे पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या पत्नी अनिता शर्मा यांचा गंगा राम रुग्णालयात मृत्यू झाला असून पत्नीच्या हत्येप्रकरणी देवेंद्र शर्मा यांना जावई वरुण अरोरावर संशय आहे, असेही सांगितले. सासऱ्याने फेब्रुवारी महिन्यातील त्या घटनेचा उल्लेखही केला जेव्हा या जावयाने संपूर्ण कुटुंबाला मासे बनवून खाऊ घातले, पण त्याने आपल्या मुलांना ते खाऊ दिलं नाही तसेच स्वत:ही ते खाल्लं नाही. या खाण्यात त्याने विषारी पदार्थ मिसळला असावा, असाही संशय त्यांनी व्यक्त केला.

सासऱ्याच्या संशयानंतर पोलिसांनी जेव्हा मृतक सासूचं शवविच्छेदन करवलं तेव्हा महिलेच्या शरिरात थेलियम मोठ्या प्रमाणात आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या पत्नीचीही आरोग्य तपासणी केली जेव्हा ती कोमात होती. आरोपीच्या पत्नीच्या शरिरातही थेलियमची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळून आली. पोलिसांनी तातडीने आरोपीच्या लॅपटॉप आणि सिस्टिम जप्त करुन तपास केला त्यावेळी पोलिसांना त्याच्या इंटरनेट हिस्ट्रीमध्ये सद्दाम हुसेन संबंधित माहिती मिळाली.

आरोपीने गुगल करून कशा प्रकारे सद्दाम हुसेन आपल्या राजकीय विरोधकांना जीवानिशी मारण्यासाठी थेलियमचा वापर करतो, याचा अभ्यास केला होता. सध्या पोलिसांनी आरोपी व्यावसायिक वरुण अरोराला अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यात आपल्या सासू, सासरे, मेव्हणी आणि पत्नीला माशाच्या कालवणासोबत थेलियम खाऊ घातले. त्यानंतर त्याच्या सासूचा मृत्यू झाला आणि त्याची पत्नी कोमामध्ये गेली तर मेव्हणीचाही मृत्यू झाला

थेलियम काय असतं ?

थेलियम एक आत्याधिक विषारी धातू रासायनिक तत्व आहे. याचा शोध इंग्रजी वैज्ञानिक विलिअम क्रुक्स यांनी 19 व्या शताब्दीत एका विशेष सेलेनियम युक्त पायराईटमध्ये वर्णक्रममापी उपकरणाद्वारे केली होती. थेलियमचा उपयोग किटक आणि उंदिरासाठी विष म्हणून केलं जात होतं. कारण, याच्या विषबाधेमुळे माणसांना धोका होता त्यामुळे याचा वापर थांबवण्यात आला होता.


शेअर करा