कोरोनाचे थैमान ..काल राज्यात तब्बल ‘ इतके ‘ मृत्यू..जाणून घ्या आकडेवारी

शेअर करा

नगर शहरात देखील कोरोनाने थैमान घातलेले असून ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर बेडसाठी अक्षरश: ३० -३० हॉस्पिटल फिरून देखील बेड मिळत नसल्याचे चित्र आहे तर खाजगी रुग्णालयात देखील बेड तसेच व्हेंटीलेटर नसल्याचे सांगत क्रिटिकल केस असलेल्या रुग्णांना प्रवेश नाकारला जात आहे . सरकारी रुग्णालयात सुद्धा जागा मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धडपड करावी लागत आहे तर खाजगी रुग्णालयात देखील वयस्कर तसेच ज्या नागरिकांचा कोरोना स्कोअर जास्त आहे त्यांना दाखल करून घेतले जात नसल्याचे चित्र आहे .

राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाबाधित मृत्यूच्या आकड्यातही वाढ होत आहे. काल राज्यात दिवसभरात सर्वाधिक 985 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित मृतांची संख्या 67 हजार 214 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे . राज्यात काल दिवसभरात 985 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू हे पुणे महापालिकेत झाले आहेत. पुणे महापालिकेत दिवसभरात 117 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्यापाठोपाठ ठाणे आणि मुंबई महापालिकेत कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही सातत्याने वाढत आहे. काल राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा हा सर्वाधिक असल्याचे समोर आले. त्यामुळे वाढते कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोनाने महाराष्ट्रात इतकं थैमान घातलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली आहे.
राज्यात सर्वाधिक मृत्यू झालेली ठिकाणं

पुणे पालिका – 117
ठाणे पालिका – 92
मुंबई पालिका – 78
औरंगाबाद – 80
नागपूर पालिका – 69
नंदुरबार – 43

गेल्या 5 दिवसातील कोरोनामुळे मृत्यूंची संख्या

28 एप्रिल – 985
27 एप्रिल – 895
26 एप्रिल – 524
25 एप्रिल – 832
24 एप्रिल – 676

राज्यात काल 63,309 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात काल 63,309 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 44,73,394 झाली आहे. राज्यात काल 62,181 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आतापर्यंत एकूण 37,30,729 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे.


शेअर करा