कोरोनाची तिसरी लाट ‘ ह्या ‘ वयोगटातील मुलांसाठी ठरू शकते धोक्याची

शेअर करा

कोरोनाची पहिली लाट पन्नास वर्षांवरील नागरिकांसाठी जीवघेणी ठरली तर दुसऱ्या लाटेने २० ते ५० वयोगटातील देखील व्यक्तींना तसेच त्याहीपेक्षा पुढील वयोगटातील देखील व्यक्तींना मोठ्या प्रमाणात विळख्यात घेतले . आता तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त होत असून या लाटेचा सर्वाधिक धोका १२ ते १८ वयोगटातील मुलांना होणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे.

राज्यभरात पेडियाट्रिक तसेच न्युओनेटल व्हेंटिलेटरची गरज मोठ्या प्रमाणात भासणार असून बालरोग तज्ज्ञांचा सल्ला राज्य शासनाने घ्यावा असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत १२ ते १८ याच वयोगटातील मुले कोरोनाच्या बाबतीत सर्वाधिक सुरक्षित मानली जात होती मात्र या नवीन संकेताने देशाची चिंता आणखी वाढवली आहे .

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुमारे चार हजारांवर मृत्यू झाले. यात जेष्ठांची संख्या ८५ टक्के होती. मात्र, २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेने हाहाकार पसरला. २० वर्षाच्या वरील तरुण बाधित होण्याचे प्रमाण वाढले. शासनाने आता १८ वर्षापर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली. त्यामुळे त्यांना संरक्षण मिळणार आहे. मात्र, राहिलेले १२ ते १८ वयोगटातील मुलं तिसऱ्या लाटेत बाधित होतील, असा अंदाज व्यक्त आहे .

मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाचे विकार आणि यकृत व मूत्रपिंड विकारासारख्या सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते, असे मनावर बिंबवण्यात आले. दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा विळखा ज्येष्ठांसोबतच तरुणांना पडला. यात नागपुरात नव्या रुपातील पाच स्ट्रेनमुळे हे घडल्याचे सांगण्यात आले. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता प्रत्येक जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालयासह सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मुलांसाठी कोविड काळजी कक्ष तयार ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच पेडियाट्रिक व्हेंटिलेटर तसेच निओनेटल व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे, असे तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातून पुढे आले.

कोरोना संसर्गाची तिसरी लाट भारतावर आदळणार आहे, मात्र ती कधी आढळणार आणि तिची तीव्रता किती असणार हे माहित नाही, याबाबत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे तसेच सध्याच्या लाटेची तीव्रता पुढच्या महिनाभरात ओसरू लागेल, असा अंदाजही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

संसर्गाच्या दुसऱ्या लाटेतच धापा टाकणाऱ्या भारताच्या आरोग्य यंत्रणेसाठी आणि देशवासियांसाठी हा तिसऱ्या लाटेचा मोठ्या धोक्याचा इशारा केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी दिला आहे. ‘ही संभाव्य तिसरी लाट कधी येईल आणि तीव्रता किती असेल, हे आज सांगू शकत नाही. मात्र आम्हाला तयारी ठेवावीच लागेल,’ असे राघवन यांनी आज नमूद केले.

दरम्यान महाराष्ट्रासह देशातील पाच राज्यांमध्ये अजूनही सर्वाधिक मृत्यूदर असल्याचे केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले. देशात आजही दररोज २.४% या प्रमाणात नवे रुग्ण वाढ वाढत आहेत आणि हे प्रमाण कमी झाल्याशिवाय कोरोना लाटेचा सामना करण्यास करण्याची परिस्थिती नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या आतापर्यंत भारतात आलेल्या लाटा

पहिली लाट : मागच्या वर्षी मार्च – एप्रिल महिन्यात. १७ सप्टेंबर २०२० ला ९७ हजार ८६० इतके सर्वाधिक रुग्ण देशात आणले होते.दोन महिन्यांनी ही लाट ओसरून ४६ हजारांवर दैनंदिन रुग्णसंख्या आली होती.

दुसरी लाट : मार्च महिन्याच्या सुरुवातीला एक मार्चला देशात १२,२७० नवे रुग्ण आढळले होते. १ एप्रिलला ही संख्या ७५ हजारांवर गेली. महिना संपता संपता ३० एप्रिलला दैनंदिन रुग्ण संख्या ४.०२ लाखांवर पोहचली होती.


शेअर करा